<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	 xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" 
	xmlns:georss="http://www.georss.org/georss"
	xmlns:geo="http://www.w3.org/2003/01/geo/wgs84_pos#"
	>

<channel>
	<title>#dasaramelava &#8211; Sinhasan News</title>
	<atom:link href="https://www.sinhasannews.com/tag/dasaramelava/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.sinhasannews.com</link>
	<description>Breaking News 24x7</description>
	<lastBuildDate>Sun, 25 Oct 2020 16:43:22 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.2.9</generator>

<image>
	<url>https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/08/fevicon11.png</url>
	<title>#dasaramelava &#8211; Sinhasan News</title>
	<link>https://www.sinhasannews.com</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
<site xmlns="com-wordpress:feed-additions:1">181731482</site>	<item>
		<title>म्हणून शिवसैनिक शांत उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा</title>
		<link>https://www.sinhasannews.com/therefore-shiv-sainik-shant-uddhav-thackerays-warning-to-bjp-2473/</link>
		
		<dc:creator><![CDATA[Admin Sinhasan]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 25 Oct 2020 16:41:11 +0000</pubDate>
				<category><![CDATA[राजकीय]]></category>
		<category><![CDATA[#dasaramelava]]></category>
		<category><![CDATA[#udhavthakare]]></category>
		<category><![CDATA[shivsena]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.sinhasannews.com/therefore-shiv-sainik-shant-uddhav-thackerays-warning-to-bjp-2473/</guid>

					<description><![CDATA[मुंबई : सत्तेत आल्यापासून सातत्याने चारित्र्यहनन, खोटेनाटे आरोप, महाराष्ट्राची बदनामी केली जात असताना शिवसेना गप्प कशी अस बोललं जातंय पण शिवसैनिक माझं ऐकतात हे तुमचं नशीब समजा असा इशारा आज मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात भाजपला दिला आहे. ठाकरे म्हणाले शक्यतोवर संयमान बोलायचं असं मी ठरवलं आहे. संयमाच महत्त्व &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>मुंबई</strong> : सत्तेत आल्यापासून सातत्याने चारित्र्यहनन, खोटेनाटे आरोप, महाराष्ट्राची बदनामी केली जात असताना शिवसेना गप्प कशी अस बोललं जातंय पण शिवसैनिक माझं ऐकतात हे तुमचं नशीब समजा असा इशारा आज मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात भाजपला दिला आहे.</p>



<figure class="wp-block-video"><video controls src="https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/10/VID-20201025-WA0806.mp4"></video></figure>



<p>ठाकरे म्हणाले शक्यतोवर संयमान बोलायचं असं मी ठरवलं आहे. संयमाच महत्त्व मला माहित आहे. पण टक्कर देण्याची कुणात खुमखुमी असेल तर ती त्यांनी जरूर द्यावी. औरंगजेब अफजलखानाला ज्या मातीत गाडलं त्या मातीचा तेज अजून मजबूत आहे हे लक्षात ठेवावं. शिवसैनिक शांत आहे म्हणूनच तुम्ही बोलताय असाच इशारा ठाकरे यांनी एक प्रकारे आपल्या आजच्या भाषणाच्या शैलीत दिला आहे.</p>



<p>महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या छाताडावर गुढी उभारल्याशिवाय राहणार नाही. बिहारमध्ये कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचा दाखला देत ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात काही अशी बेडकं आहेत त्यांना लस, इंजेक्शन सारखी द्यावी लागतात.</p>



<p>संकटाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जात असून महाराष्ट्र पुढे जात आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जून-जुलैमध्ये जे करारनामे झाले त्यानुसार महाराष्ट्रात अनेक उद्योग सुरू होत आहेत. हजारो कोटींची गुंतवणूक भूमीपूत्रांसाठी महाराष्ट्रात येत आहे. त्यातून कुशल, अकुशल मराठी मुलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी आजच्या भाषणात सांगितलं.</p>
]]></content:encoded>
					
		
		<enclosure url="https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/10/VID-20201025-WA0806.mp4" length="4164973" type="video/mp4" />

		<media:content url="https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/10/IMG_20201025_204515-1.jpg" medium="image"></media:content>
            <post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">2473</post-id>	</item>
		<item>
		<title>पंकजा मुंडे यांच्याकडून उध्दव ठाकरे यांचे कौतुक</title>
		<link>https://www.sinhasannews.com/praise-for-uddhav-thackeray-from-pankaja-munde-2466/</link>
		
		<dc:creator><![CDATA[Admin Sinhasan]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 25 Oct 2020 13:25:54 +0000</pubDate>
				<category><![CDATA[राजकीय]]></category>
		<category><![CDATA[#dasaramelava]]></category>
		<category><![CDATA[#pankajamunde]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.sinhasannews.com/praise-for-uddhav-thackeray-from-pankaja-munde-2466/</guid>

					<description><![CDATA[बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केले आहे. मी त्यांचे अभिनंदन करते त्यांना शुभेच्छा देते. परंतु हे पॅकेज पुरेसे नाही. आपण आणखी उदारता दाखवा आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा. ते शेतकऱ्यांना दिलासा देतील असा   विश्वास पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसऱ्या मेळाव्यात &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p><strong>बीड</strong> : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केले आहे. मी त्यांचे अभिनंदन करते त्यांना शुभेच्छा देते. परंतु हे पॅकेज पुरेसे नाही. आपण आणखी उदारता दाखवा आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा. ते शेतकऱ्यांना दिलासा देतील असा   विश्वास पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसऱ्या मेळाव्यात व्यक्त केला.</p>



<figure class="wp-block-image size-large"><img decoding="async" width="787" height="1024" src="https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201024-WA0166-787x1024.jpg" alt="IMG 20201024 WA0166" class="wp-image-2455" srcset="https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201024-WA0166-787x1024.jpg 787w, https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201024-WA0166-231x300.jpg 231w, https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201024-WA0166-768x999.jpg 768w, https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201024-WA0166-600x780.jpg 600w, https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201024-WA0166.jpg 911w" sizes="(max-width: 787px) 100vw, 787px" title="पंकजा मुंडे यांच्याकडून उध्दव ठाकरे यांचे कौतुक"></figure>



<p>ऑनलाईन मेळावा घेण्याचे ठरल्यानंतर ही या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरवर्षी प्रमाणे या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऊस तोडणी कामगार प्रश्न पक्षांत राच्या चर्चा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेकी दुर्दशा अशा मुद्द्यांवर आज मुंडे यांनी भाष्य केले.</p>



<p>मी घर बदलणार नाही असं म्हणत मुंडे यांनी पक्षांतरांच्या चर्चांना आज पूर्णविराम दिला. पक्षाच काम देशाच्या पातळीवर करणार असल्याचं त्यांनी या मेळाव्यात स्पष्ट केले. आज माझ्याकडे कोणतंही पद नाही मी ग्रामपंचायत सदस्या ही नाही, पण ज्यावेळेस मी आज भगवान गडाकडे येत होते त्यावेळी गावोगावी माझे लोकांनी स्वागत केले, मला आशीर्वाद दिले. त्यावेळी का लोक माझ्यावर प्रेम करतात का माझा एवढा आदर करतात ह्याचा विचार करत असताना मला भगवान बाबांची मूर्ती आणि मुंडे साहेबांची कीर्ती दिसली.<br><br>मला तुझी काळजी वाटते असे रस्त्यात भेटलेल्या आयाबाया म्हणत होत्या. त्यांना माझी काळजी वाटणं आणि मला त्यांची काळजी वाटणं हीच आमची मोठी शक्ती आहे. ही मला मिळालेली जनसंपत्ती कमी होऊ नये हेच माझं भगवान बाबांकडे मागणं असतं. ज्या व्यक्तीविषयी प्रेमाने अपेक्षा मरून गेलेले असतात. तो राजकारणात कितीही मोठा झाला तरी लोकांना त्याचं सोयरसुतक नसतं. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. पंकजाताई गेल्या, त्या आता घरी बसल्या असा अपप्रचार झाला.  अरे मी राजकारण कसं सोडेल अस म्हणून त्यांनी अपप्रचार करणाऱ्यांचा समाचार घेतला.  ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.</p>



<p>कोरोना संकट काळात ऊस तोडणी कामगारांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी मी प्रयत्न केले. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुंडे यांनी सांगितले.  या सरकारचं चांगल्या कामांचं कौतुक करण्याचं धारिष्ट्य गोपीनाथ मुंडेंच्या कन्येत आहे. त्याचप्रमाणे या सरकारला जाब विचारण्याचं धारिष्ट्यदेखील आहे. हे धारिष्ट्य तुम्हा सगळ्यांच्या बळावर आहे. माझं जीवनच तुम्हाला अर्पण आहे&#8217;, असं ही त्या म्हणाल्या.</p>



<p>भाजपचं सरकार येईल, असं कधी वाटत नसताना मुंडे साहेबांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. शिवाजी पार्क भरुन मी सभा घेणार असे ते मित्रांना म्हणायचे, मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेचा समारोप शिवतीर्थावर झाला. त्यामुळे शिवतीर्थावर एक दिवस मी सभा घेतल्याशिवाय राहणार नाही&#8217;, असा निश्चय पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात केला.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2020/10/IMG_20201025_183847-1.jpg" medium="image"></media:content>
            <post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">2466</post-id>	</item>
	</channel>
</rss>
