राष्ट्रीय
राजस्थानमध्ये फटाक्यांवर बंदी

जयपूर: सध्याच्या कोरोना साथीच्या काळात फटाकेमुक्त दिवाळी व्हावी अशी चर्चा जोर धरू लागली आहे. मुलांसाठी दिवाळीचा आनंद आतषबाजी करण्यात असतो. परंतु यंदा साथ उलटण्याच्या भितीने चिंतेचे वातावरण आहे. फटाक्यांच्या धुराने प्रदूषण वाढते, घशाचे, फुफ्फुसाचे विकार उदभवतात, म्हणून फटाके नकोच अशी भूमिका काही संस्थांनी घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर यंदा दिवाळीत फटाक्यांच्या बंदीवर पूर्ण बंधने घालण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासiठी फटाके बंदीचा निर्णय घेतल्याचे मुख्य मंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले.







