उद्योगराष्ट्रीय

Budget 2022 : प्राप्तिकरात कोणताही बदल नाही हा दिलासाच : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : प्राप्तिकरात कोणताही बदल न केल्याने नोकरदार व्यक्तीसाठी एक प्रकारे मोठा दिलासाच आहे, असे संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

सरकारने दोन वर्षात आयकराच्या नावाने एक पैसाही वाढवला नाही. म्हणजेच हा देखील एक दिलासाच आहे, असे त्या म्हणाल्या. वित्तीय तूट कितीही असली तरी करोनाच्या या महामारीच्या काळात जनतेवर कराचा बोजा पडू नये, असा आदेश गेल्या वेळी पंतप्रधान मोदींनी दिला होता. तोच आदेश यावेळीही देण्यात आला होता. गेल्या अर्थसंकल्पात तसेच या अर्थसंकल्पातही याची अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी जारी करेल.काळ्या पैशाबाबत अनेक देशांसोबत माहितीची देवाण-घेवाण करण्यात येत आहे, असं सीतारामन म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये