पुणे शहर

पुण्यातील नवले पुलावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; पाच जणांचा मृत्यू, 20 जण गंभीर जखमी

पुणे : पुण्यातील मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कात्रज येथे नवले पुलावर विचित्र असा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नवले पुल हे ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते.

याच पुलावर आता तीन वाहनांची टक्कर झाली आहे. दोन कंटेनरची एकमेकांना धडक झाली असून यामध्ये एक कार अडकली, ज्यानंतर या वाहनांना आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात प्राथमिक माहितीनुसार, 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर 20 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Img 20250508 wa00015038950216212096978
Fb img 17620776420884188237802217418510

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये