महाराष्ट्र

‘जय भीम’ हा कुठल्याही जातीचा नारा नसून क्रांतिकारी ऊर्जास्रोत; जितेंद्र आव्हाडांची घटकंचुकी प्रथेवर टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटकंचुकी प्रथेवरून जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्वीट करत याबाबत भूमिका व्यक्त केली. ‘जय भीम’ हा कुठल्याही जातीचा नारा नसून ते क्रांतिकारी ऊर्जास्रोत आहे, असे ट्वीटही त्यांनी केले आहे.

Img 20221228 wa0001281294303512961784024189

घटकंचुकी प्रथेवरून जोरदार हल्ला चढवताना त्यांनी ट्वीट केले आहे की, “प्रथेप्रमाणे ५००० वर्षे शूद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज झाकताच येत नव्हते. याचे कुणी उत्तर देईल का?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. तसेच “५००० वर्षे स्त्री उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणाऱ्यांनी भुंकू नये,” असं म्हणत हल्लाबोल केला. त्यांनी सोमवारी (९ जानेवारी) ट्वीट करत याबाबत भूमिका व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “याचे कुणी उत्तर देईल का की, प्रथेप्रमाणे ५००० वर्षे शूद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज झाकताच येत नव्हते. घटकंचुकीची माहिती द्या की नव्या पिढीला. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मनाप्रमाणे वागता तरी येते. ५००० वर्षे स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणाऱ्यांनी भुंकू नये.”

याआधी आव्हाडांनी संयुक्त राष्ट्रसंघातील एक व्हिडीओही ट्वीट केला होता. यात ते म्हणाले, “संयुक्त राष्ट्रसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येशू ख्रिस्त, मोसेस, जेफर्सन आणि लिंकन यांच्याबरोबर तुलना करण्यात आली. त्याचबरोबर तेथे जय भीमचा नाराही देण्यात आला. मी म्हणतो ते सत्य आहे की, ‘जय भीम’ हा कुठल्याही जातीचा नारा नसून ते क्रांतिकारी ऊर्जास्रोत आहे.

जातनिहाय जनगणनेची मागणी

आव्हाडांनी बिहारमधील जातनिहाय जनगणनेवरही आपली भूमिका स्पष्ट केली होती. “बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही? यासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेत एकमतानी ठराव पारीत केला आहे. हा ठराव करायचा म्हणून केला का? हा ठराव केला तेव्हा नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते,”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये