शिवसेनेने काँग्रेसची योग्य ती समजुत काढावी. काय म्हंटले औरंगाबाद नामकरणाबाबत चंद्रकांत पाटील

पुणे : ” औरंगाबादच्या नामकरण विषयाला काँग्रेसने पण म्हणजे, काँग्रेसचं विरोध करतय. शिवसेनेने काँग्रेस ला योग्य ते समजवाव. शेवट जितकी शिवसेनेला सरकार चालवण्यासाठी त्यांची गरज आहे तेवढीच काँग्रेसला आहे सरकार चालण्याची. भाजपाची सगळ्यांनाच भिती आहे.” असं भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
आज पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकात पाटील यांनी शहरातील प्रश्नांबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या नंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी औरंगाबाद नामकरणाबाबत प्रश्न विचारला असता पाटील यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

“औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर मध्ये करणं हा काही राजकारणाचा विषय नाही. औरंगजेब हा काही आपल्यापैकी कोणाचा पूर्वज नाही त्यामुळे मुळात हा वादाचा मुद्दा नाही. राजकारण, वाद करण्यापेक्षा नामकरणासाठी जी प्रक्रिया करावी लागणार आहे ती करण्याची गरज आहे.” असे पाटील यांनी म्हंटले आहे.






