राजकीय पक्ष जातीमध्ये गुंतवतात, राज्यपालांची वक्तव्येही निषेधार्थ : राज ठाकरे

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज्यपालांची वक्तव्ये निषेधार्थ असून महाराष्ट्रातील राजकीय पक्ष नागरिकांना जातीमध्ये गुंतवून ठेवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे म्हणाले, ‘तुम्हाला काय कळतं का? शिवाजी महाराज, रामदास स्वामी….आपला काय संबंध नसताना काहीही बोलून जायचं. शिवाजी महाराजांनी कधीही सांगितलं नाही की रामदास स्वामी माझे गुरू आहेत, ना रामदास स्वामींनी सांगितलं शिवाजी महाराज माझे शिष्य आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण..#मनसे_वर्धापन_दिन #MNSFoundationDay
Posted by MNS Adhikrut on Wednesday, March 9, 2022
मनसेचं 16 वं वरीस इतरांसाठी धोक्याचं आहे पण मनसेसाठी मोक्याचं आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले. तसंच मुंबई आणि पुण्यातरी परिस्थिती पाहून वातावरण बदलतंय याचा अंदाज येतोय असं सांगत महापालिका निवडणुकीत नुसतं लढायचं नाही तर जिंकायचंय या हेतूने मैदानात उतरु आणि कामयाबी मिळवू, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला. मेळाव्याला मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, अनिल शिदोरे, अमित ठाकरे आदी उपस्थित होते.



