राष्ट्रीयसांस्कृतिक

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन

लखनौ : अप्रतिम शायरीमुळे देशातील घराघरात पोहोचलेले आणि आपल्या आवाजाने महानायक अमिताभ बच्चन यांनाही भुरळ घालणारे शतकातील महान शायर मुनव्वर राणा यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. राणा गेल्या काही वर्षापासून आजारी होते. एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते 71 वर्षाचे होते. 

मुनव्वर राणा यांना दोन दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. किडनी फेल्युअर झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आठवड्यातून तीन वेळा त्यांचा डायलिसीस करण्यात येत होतं. त्यांना क्रोनिक किडनीचा आजार होता. त्यामुळेच त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला जाणंही बंद केलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी छातीत दुखू लागल्याची तक्रारही केली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना निमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवलं होतं.

राणा हे देशातील प्रसिद्ध शायरांपैकी एक होते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. शाहदाबा या कवितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय त्यांना माटी रतन सन्मानानेही पुरस्कृत करण्यात आलं होतं. राणा यांना त्यांच्या आईवरील शायरीने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून दिली होती. देशातच नव्हे तर परदेशातही त्यांची लोकप्रियता होती. त्यांचा आवाजही दमदार होता. बॉलिवूड अभिनेते, महानायक अमिताभ बच्चनही त्यांच्या आवाजावर फिदा होते.

वाद आणि राणा

वाद आणि राणा यांचं अतूट नातं होतं. 2022च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. योगी आदित्यनाथ पुन्हा निवडून आले तर मी यूपी सोडून जाईल. दिल्ली किंवा कोलकाता येथे जाऊन राहीन. माझ्या वडिलांनी पाकिस्तानात जाणं नाकारलं. पण मला मजबुरीने आपलं शहर, प्रदेश आणि माझी माती सोडून जावं लागेल, असं विधान राणा यांनी केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

असहिष्णुतेमुळे पुरस्कार परत

राणा हे देशातील प्रसिद्ध शायरांपैकी एक होते. ते कवी होते. उर्दूसह हिंदी आणि अवधी भाषेत त्यांनी लिखाण केलं होतं. राणा यांनी आपल्या शायरीत वेगवेगळे प्रयोग केले. त्यांनी वेगवेगळ्या शैलीतील गजल प्रसिद्ध केल्या होत्या. ऊर्दु साहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर माटी रतन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर एक वर्षानंतर त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परतही केला होता. वाढत्या असहिष्णुतेमुळे त्यांनी सरकारी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.

राणा यांची शायरी…

लती फिरती हुई आँखों से अज़ाँ देखी है

मैं ने जन्नत तो नहीं देखी है माँ देखी है

—————–

तुम्हारी आँखों की तौहीन है ज़रा सोचो

तुम्हारा चाहने वाला शराब पीता है

———————-

भी ज़िंदा है माँ मेरी मुझे कुछ भी नहीं होगा

मैं घर से जब निकलता हूँ दुआ भी साथ चलती है

————————-

ब भी कश्ती मिरी सैलाब में आ जाती है

माँ दुआ करती हुई ख़्वाब में आ जाती है

————————–

सो जाते हैं फ़ुटपाथ पे अख़बार बिछा कर

मज़दूर कभी नींद की गोली नहीं खाते

————————-

कुछ बिखरी हुई यादों के क़िस्से भी बहुत थे

कुछ उस ने भी बालों को खुला छोड़ दिया था

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये