महाराष्ट्र
नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे उपमुख्यमंत्र्यांचे
नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे उपमुख्यमंत्र्यांचे
आदेश

मुंबई : कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे यंत्रणांनी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध अधिक धडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी आज प्रशासनाला दिले. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.



