महाराष्ट्र

मागच्या 10 वर्षांच्या काळात किती विकास… माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

पुणे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या काळातील कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आम्हाला या निवडणुकीत आशादायी चित्र दिसत आहे. नरेंद्र मोदींच्या 10 वर्षात किती विकास झाला? किती अधोगती झाली? 2014 मध्ये दिलेली आश्वासन पूर्ण झालीत का? त्यांनी जर याची तुलना केली असती तर बरं झालं असतं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पुण्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

इंडिया आघाडीचे सरकार येईल तेव्हा ज्यांनी परदेशात काळे लपवले आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मोदी सरकारकडे यासंदर्भात सर्व कागदपत्रे असताना त्यांनी कारवाई केली नाही. मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार, असं आश्वसन दिले होते. मात्र हे फक्त निवडणुकीपुरते आश्वासन देण्यात आले होते, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हटले होते की, आतंकवाद संपेल, तो संपला नाही. मागे दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही. मग आता दिलेली आश्वासने कशी पूर्ण होणार? मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेचा विकास मंदावलेला आहे. ते मान्य करत नाहीत. ते पाठ थोपटून घेतात. देशावर 206 लाख कोटींचं कर्ज आहे. आर्थिक नैतिक भ्रष्टाचार सुरु आहे, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

नरेंद्र मोदींनी ऑपरेशन कमळ केलं. आमदारांची-खासदारांची खरेदी-विक्री केली. आमदार त्यांच्यासोबत गेले. पण मतदार गेले नाहीत. नरेंद्र मोदी हुकुमशाहीच्या दिशेने जात आहेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव होणं गरजेचा आहे, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

Img 20240404 wa00195661228638643442239
Img 20240404 wa00154462680026350583661
Img 20240404 wa00142311409567432001146

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये