मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा निर्णय

मुंबई : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकलली आहे. राज्यात 200 पेक्षा अधिक ठिकाणी या परीक्षा होणार होत्या. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातचं राज्यात रविवारी एमपीएससी परीक्षा होणार होत्या. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले असून एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक धनंजय जाधव म्हणाले,MPSC परिक्षा पुढे ढकलण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री व मंत्री मंडळाने सकारात्मक दाखवली त्याबद्दल मनपूर्वक आभार .तसेच मराठा समाजाच्या इतर प्रश्नांबाबत व आरक्षणाच्या बाबतीत अशीच सकारात्मकता दाखवावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चा चा हा लढा सुरु राहिल.



