“स्वातंत्र्य लढ्यात लिंगायतांचे योगदान” पुस्तकाचे प्रकाशन
स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ; धानोरी येथील शिवयोगी चौकात प्रकाशन सोहळा संपन्न
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून धानोरी (पुणे) येथील शिवयोगी प्रतिष्ठानच्या वतीने राजु जुबरे व डॉ. भीमराव पाटील लिखित “स्वातंत्र्य लढ्यात लिंगायतांचे योगदान” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील विविध भागांतील ७५ ठिकाणी या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन सोमवारी (दि.१५) करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर धानोरी (पुणे) येथील शिवयोगी चौकात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पुस्तकाचे प्रकाशन प्रणयराज सोसायटीचे चेअरमन जगजितसिंग बांगर, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत टिंगरे, गणेश पाटील, शशिकांत भोसले, राजू ठोंबरे, हनुमंत कुटे, पोलीस नाईक प्रवीण भालचिम यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरुनाथ बिराजदार, मार्गदर्शक यशवंत बिराजदार, सुनील समाने सर, प्रकाश बिराजदार, संतोष सातपुते, डॉ.दत्ता खैरनार, सुशील देटे, अरुण बिराजदार, अमित महापदी, वैभव रणसिंग, प्रदीप थोरात, वृषाली बिराजदार, प्रांजली समाने,डॉ. स्मिता बिराजदार, पूर्वा बिराजदार, स्वरा बिराजदार, काव्या बिराजदार, नमन बिराजदार, नयन बिराजदार, श्रवण बिराजदार उपस्थित होते.
स्वातंञ्य लढा हा सर्व भारतीयांच्या एकात्मतेचा लढा होता. या लढ्यात लिंगायत समाजाचेही ऐतिहासिक योगदान होते.१२ व्या शतकापासूनच लिंगायत समाजाला क्षाञतेजाची पराक्रमी परंपरा लाभली आहे. तोच वारसा जपत १८५७ च्या उठावापूर्वीपासून (कित्तुर राणी चन्नम्मा-१८२४) ते गोवा मुक्तीसंग्राम (१९६१) पर्यंतच्या सर्व लढ्यात लिंगायत समाजाने सक्रिय असा लढा दिला आहे. लिंगायत समाजातील पूर्वजांच्या शौर्याची, वीरत्वाची, त्याग, बलिदानाची परंपरा “स्वातंञ्यलढ्यात लिंगायतांचे योगदान” या पुस्तकात मांडली आहे. ही लिंगायत समाजासह सर्वांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे.