बेलेश्वर मंदिरातल्या विहिरीत पडून १२ भाविकांचा मृत्यू
इंदूर : येथील बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळी या मंदिरात असलेल्या पुरातन विहिरीचं छत कोसळून अपघात झाला. या अपघातात सुमारे २५ ते ३० जण या विहिरीत पडले. त्यानंतर या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचावकार्य करणाऱ्या पथकाने १२ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर इतर १९ जणांवर उपचार सुरू आहेत. १२ मृतांमध्ये १० महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी ही माहिती दिली आहे की ज्या मंदिरात ही दुर्घटना घडली तिथे मदत आणि बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आलं होतं. मदत आणि बचावकार्य करताना १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच मृतांच्या नातेवाईकांना आम्ही तातडीने मदत देण्याचंही जाहीर करतो आहोत. तसंच या घटनेत जे जखमी झाले त्यांनाही मदत केली जाणार आहे. १२ मृतदेहांमध्ये १० महिला आहेत. तर एका पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना नेमकी कशी घडली त्याची चौकशी करण्याचे आदेशही आम्ही दिले आहेत असंही मिश्रा यांनी स्पष्ट केलं.
इंदूरच्या बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळी अचानक विहिरीचं छत कोसळलं. २५ ते ३० भाविक या विहिरीत कोसळले आहेत. मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. इंदूरच्या बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता त्यावेळी विहिरीचं छत कोसळलं आणि त्यामध्ये २५ ते ३० भाविक पडले. मंदिरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर मदत आणि बचावकार्यही तातडीने सुरू करण्यात आलं.