पुणे शहर

जनता दरबारच्या माध्यमातून मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरुडकरांशी संवाद

समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून कोथरुडमधील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी महापालिका तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित तक्रारी नागरिकांनी मांडल्या. त्यावर ना. पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.

जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या तत्परतेने ऐकून घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनांबद्दल समाधान व्यक्त केले. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू असलेला हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोथरुड हे माझे कुटुंब आहे आणि या कुटुंबप्रमुख या नात्याने येथील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवणे ही माझी नेहमीच प्राथमिकता आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासन अधिक लोकाभिमुख, संवेदनशील आणि उत्तरदायी बनविण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील.”

Img 20260222 wa00063491038201882637992

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये