
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कर रचनेत कोणताही बदल केला नाही. करदात्यासाठी नवीन आणि जुनी अशा दोन कर रचना कायम ठेवण्यात आली होती. बजेटमध्ये कर रचनेचे दोन स्तर कायम ठेवण्यात आले. प्राप्तिकर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे करदात्यांची घोर निराशा झाली आहे.

प्राप्तिकरासंबंधी अनेक अपेक्षा करदात्यांनी केल्या होत्या. प्राप्तिकर अधिनियमच्या 80 क अंतर्गत दीड लाख रुपयांच्या सध्याच्या मर्यादेवर कर सवलत वाढवण्याची मागणी होती. तर अतिरिक्त करमुक्त उत्पन्न- निश्चित स्वरुपात एक कर-बचतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढवण्याची शक्यता होती. सामान्य माणसाने लॉकडाऊनच्या काळात आणि वेतन कपातीमुळे तसेच घरून काम करण्याच्या वातावरणात नोकरी करण्यासाठी अतिरिक्त खर्च केला. त्यामुळे पगारदार कर्मचारी प्राप्तिकर सवलतीची अपेक्षा धरून होता मात्र या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.