महाराष्ट्र

भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो ; आदित्य ठाकरे यांच्यावरील टिकेनंतर नितेश राणे यांचे ट्विट

मुंबई : १२ भाजप आमदारांच्या निलंबना नंतर निषेध व्यक्त करताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आक्षपार्ह विधान केले होते. या विधानावरून गोंधळ निर्माण झाला होता. परंतु आज नितेश राणे यांनी आपल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करत माघार घेतली आहे. The word withdraws if the emotion is hurt. : Nitesh Rane

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी  अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधी मंडळाच्या पायऱ्यांवर बसूनच भाजप आमदारांनी सरकारविरोधात आपला राग व्यक्त केला. यावेळी  भाषण करताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.

आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं वादग्रस्त आणि आक्षेपाचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करण्यात आलं आहे.

Img 20210707 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये